बर्‍याच वेळा अापण बोलताना म्हणींचा वापर करतो त्याच प्रमाणे संस्कृत सुभाषितांचाहि वापर करतो . संपूर्ण सुभाषित न वापरता  त्यातील एखाद्या तुकड्याचा वापर सामान्यत:केला जातो .सुभाषितामुळे अत्यंत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय आपल्याला सहज  मांडता येतो .ज्याला दोन ओळींमधील गुह्यार्थ असे म्हणता येईल असा भावहि या संस्कृत सुभाषिता मध्ये असतो .इंग्लिश माध्यमामुळे ,  व मराठी माध्यम असले तरी अनेक कारणांनी  वाचनसंस्कृतीचा मुलांमध्ये र्‍हास  झाल्यामुळे  बर्‍याच वेळा उच्चारलेल्या म्हणीचा किंवा संस्कृत सुभाषिताचा अर्थ मुलांना कळत नाही .  पालकांनी मुलांना या सुभाषितांची ओळख करून दिल्यास  या प्रयोगामुळे  संस्कृत सुभाषिते माहीत होतील  .बोलण्यामध्ये जास्त अर्थपूर्णता  लालित्य व सौंदर्य निर्माण होईल .जीभ लवचिक व भाषा कमनीय, सौष्ठवपूर्ण होईल
         
नरत्वं दुर्लभं लोके विद्या तत्र सुदुर्लभा।
शीलं च दुर्लभं तत्र विनयस्तत्र सुदुर्लभः॥

मनुष्याचा जन्म मिळणे कठीण असते. त्यातही शिक्षण मिळण अजून अवघड असत त्यातही चारित्र्य संपादन करणं अधिक कठीण आणि एवढ [असूनही ] नम्रपणा [असणारा ] फारुच विरळा .

विनयस्तत्र सुदुर्लभ:एवढे वचन वापरले तरीही संपूर्ण आशय लक्षात येतो .नरजन्म ,विद्या, चारित्र्य, आणि त्याबरोबरच नम्रपणा या चार गोष्टी एकत्र असणे दुर्लभ आहे .--विद्या विनयेन शोभते असे संस्कृत वचन आठवले .मनुष्य जन्म असेल ,परंतु चारित्र्य नसेल; विद्या असेल  , परंतु गर्व मग्रुरी उर्मटपणा अहंकार असेल ;.तर मनुष्य जन्माचा व विद्येचा काय उपयोग ?नरजन्म विद्या चारित्र्य आणि नम्रपणा हे सर्व एकत्र असणे जरा दुर्मिळच .दूध साखर केशर आणि त्याला वेलचीचा सुगंध  या गोष्टी एकत्रित असलेल्याप्रमाणे मिश्रणाप्रमाणेअसा मनुष्य  मधुर असेल .

           स्मरणीय 
       विनयस्तत्र सुदु्र्लभ:

२५/८/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel