कौरवांच्या जन्माची कहाणी


एकदा महर्षी वेदव्यास हस्तिनापुरात आले. गांधारीने त्यांची खूप सेवा केली. ज्यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी गांधारीला वरदान मागण्यास सांगितले. गांधारीने वरदान मागितले की आपल्याला आपल्या पतीसारखेच बलवान १०० पुत्र व्हावेत. वेळ झाल्यावर गांधारी गर्भवती राहिली आणि गर्भ २ वर्षांपर्यंत पोटातच राहिला. त्यामुळे गांधारी घाबरली आणि तिने तो गर्भ पडून टाकला. तिच्या पोटातून एक लोखंडासारखा मांसपिंड निघाला. आपल्या योगदृष्टीने महर्षी वेदव्यास यांनी हे सर्व पहिले आणि ते तत्काळ गांधारीला भेटायला आले. तेव्हा गांधारीने त्यांना तो मांसपिंड दाखवला. त्यांनी गांधारीला सांगितले की तू लगेच शंभर कुंड बनवून त्यांना तुपाने भरून सुरक्षित जागी त्यांच्या रक्षणाची व्यवस्था कर आणि या मांसपिंडावर पाणी शिंपड. पाणी शिंपडल्यावर त्या मांसपिंडाचे १०० तुकडे झाले. व्यासांनी सांगितले की या १०० तुकड्यांना तुपाने भरलेल्या कुंडांमध्ये घाल. आणि ती कुंड २ वर्षांनंतरच उघड. एवढे बोलून वेदव्यास तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात निघून गेले. वेळ झाल्यावर याच कुंडांतून प्रथम दुर्योधन, आणि नंतर गांधारीचे ९९ पुत्र आणि एक कन्या उत्पन्न झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel