९०

दिल्लीचे ते शेवटचे दिवस. आता शेवटचे म्हणून म्हणायचे. त्या वेळेस हे दिवस शेवटचे अशी कोणालाच कल्पना नव्हती. एके दिवशी महात्माजींचे पुत्र देवदास, हे गांधीजींकडे आले होते. देवदास दिल्लीलाच असत. हिंदुस्थान टाइम्सचे संपादक. बहुधा रात्री थोडा वेळ ते येऊन जात.

बोलणे वगैरे झाले. नंतर देवदास म्हणाले : ‘बापू, आज मी प्यारेलालजींना घरी जेवायला नेणार आहे. नेऊ ना?’

‘ने, ने. खरचं ने. परंतु काय रे, मला जेवायला बोलवायचं कधी नाही ना मनात येत?’ बापू बालले आणि नंतर मोकळेपणाने हसले, पितापुत्रांचा गोड विनोद!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel