(नवरात्रीचे दिवस सुरू होतात. परंपरेनुसार त्या तिघींना उपवास धरणे, चप्पल पाळणे यांसारख्या इतर गोष्टी कराव्या लागतात. शीतलला अनवाणी पायाने चालण्याने भरपूर त्रास व्हायला लागलेला असतो; तेव्हा तिच्या आईसोबत तिचा हा संवाद घडतो.)

शीतल:- आई मला उपवास मोडू दे ना... खूप भूक लागलीये. 

शीतलची आई:- येडी झाली का कायं तू ?? असं अचानक मध्येच काय झालं तुला?

शीतल:-( कळकळीने ) आई दिवसभर अनवाणी पायाने चालण्याने त्रास होतोयं गं.... 

शीतलची आई:-  मग खिचडी खा फराळ करून घेत होता शितल आई जेवल्याशिवाय चेन्नई पडणार मला भाकरी खाऊ देणार 

शीतलची आई:- फराळ कर. नाहीतर जाऊन झोप. मला त्रास नको देऊ.....

शीतल:- मी चालले झोपायला. ( रागात खोलीत निघून जाते ) (शीतल घरात जाऊन न जेवता झोपी जाते दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या लक्षात येतं की, तिला ताप आला आहे; ती आईला तस सांगते.)

शीतल:- आई मला ताप आलायं बरं वाटत नाहीये.

शीतलची आई:-  थांब मी सरकारी दवाखान्यातून गोळ्या घेऊन येते.

(शीतल त्यादिवशी शाळेत न जाता घरीच आराम करते. दोन दिवस तिचं शाळेत जाणं काही होत नाही. मग प्रगती तिला भेटायला तिच्या घरी येते.)

प्रगती:- (दारातून आवाज देते) काकू शीतल आहे का घरात? 

शीतलची आई:-हो हायं पोर घरीच. ये आत. (प्रगती आत जाऊन शितल जवळ बसते.)

प्रगती:- शितल काय झालं? खूपच आजारी पडलीस बघू.... 

शीतल:- हो ना. तापाने काहीच कळना झालयं बघं.
(प्रगती शीतलला हात लावून बघते. तीला बबऱ्यापैकी ताप असतो.)

प्रगती:- काकू शीतलला दवाखान्यात घेऊन गेला होतात का?? 

शीतलची आई:- अगं नाही त्याची काही गरज नाही दोन-तीन दिवसात होऊन जाईल कमी. गोळ्या चालू हायत.

प्रगती:- बरं काकू मी निघते शाळेला जायला. पण तुम्ही एकदा दवाखान्यात तिला घेऊन जायला हवं.

शीतलची आई:- बरं मी सांगते तिच्या बाबांना तिला दवाखाण्यात घेऊन जायला.

(प्रगती निघूण जाते. तीन दिवस निघून जातात. शीतलच्या दुखण्याकडे कोणी खास लक्ष न दिल्याने तिचा मृत्यू होतो. मृत्यूनंतर समजतं की, तिला "निमोनिया" हा आजार झाला होता; परंतु वेळीच उपचार न झाल्याने तिचा नाहक बळी जातो.)
 

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel