(अनिकेत व प्रगती जे अत्यंत चांगले मित्र असतात, त्यांच्यात हा संवाद सुरू असतो. शाळा भरण्याआधीच हे दोघे लवकर येऊन वर्गात बसलेले असतात.)

 

अनिकेत:- तुला वाटतं आपलं गाव बदलेल?

 

 प्रगती:- माहित नाही. खूप अवघड आहे. आपल्या लोकांची वैचारिक क्षमता फार फार तर वाद घडवून आणण्यापर्यंतच.

 

अनिकेत:- हो आपल्या लोकांना कधी समजणार की, मुलांना थोडं मनमोकळं जगू द्यायला हवं. मी घरी क्रिकेटच नाव जरी काढायचं म्हटलं ना तरी कल्याण.... 

 

प्रगती:- मी ठरवलयं या गावातून आणि भुरसटलेल्या विचारसरणी असलेल्या दुनियेतून बाहेर पडायचयं.

 

अनिकेत:- हो. किमान आपण स्वतंत्र व्यक्ती आहोत; असं वाटणाऱ्या जगात प्रवेश करायचायं मला.

 

प्रगती:- तुला सांगू कधीकधी घरातले वाद इतके असह्य होतात की, जीव द्यावासा वाटतो. पण नंतर प्रश्न पडतो जीव कोणत्या लोकांसाठी द्यायचा; ज्यांच्यावर फार फार तर चार दिवस फरक पडेल.

 

अनिकेत:- हे बघं, एकदा आपली दहावी होऊन जाऊ दे. मग आपण नक्कीच येथून बाहेर पडू. आणि मला खात्री आहे तू पुढील भविष्यात नक्कीच उत्तम गोष्टी करशील.

 

प्रगती:- तुझा विश्वास असाच ठेव. 

 

अनिकेत:- हो.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel