(अंजली पळून गेल्याचे भयंकर पडसाद प्रगतीच्या आयुष्यावर उमटायला सुरू होतात. एकही व्यक्ती तिला घालून-पाडून बोलायचं सोडत नसते. खूप विचार करून प्रगती देखील गाव सोडण्याचा निर्णय घेते. आणि हा विचार ती अनिकेत समोर मांडते.)

प्रगती:- मला वाटतं हीच योग्य वेळ आहे. 

अनिकेत:- कशाची? मला नीट सांग जरा प्रगती....

प्रगती:- आपण गाव सोडून जाऊ या ना अनिकेत. 

अनिकेत:-अगं एका घटनेचे पडसाद पाहिलेस ना तू तरी...

प्रगती:- पाहिलेत म्हणूनच म्हणतीये.... 

अनिकेत:- तुझा निर्णय नक्की ठाम झालयं का? 

प्रगती:- हो. माझा निर्णय पूर्णपणे झाला आहे. 

अनिकेत:- ठीक आहे सोबत गाव सोडूयात.

प्रगती:- माझ्याजवळ आपल्याला एक महिना पुरतील एवढे पैसे आहेत.

अनिकेत:- माझ्या जवळही आहेत. आपण नव्याने आयुष्य सुरू करू. 

प्रगती:- हो. जे केवळ आपलं आणि आपल्याच आयुष्य असेल.

अनिकेत:- हो पण पुढची प्लॅनिंग करायला मला चार पाच दिवस वेळ दे. नंतर आपण निघू. 

प्रगती:- हो. चालेल.
( हा प्रसंग इथेच संपतो.)
 

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel