२५ डिसेंबर १९१०. एका कल्पक व्यक्तीने "हॉल ऑफ अमेरिका इंडीया पिक्चर पलेस" मध्ये प्रवेश केला. तिथे त्या व्यक्तीने 'द लाइफ ऑफ क्राईस्ट' चित्रपट पाहिला. चित्रपट बघून बाहेर पडतेवेळी तिच्या मनात केवळ भारताच्या चित्रपट व्यवसायाच्या विकासाबद्दलच विचार होते. ती व्यक्ती म्हणजेच श्री.दादासाहेब फाळके. त्या वेळी जर त्यांच्या पत्नीने त्यांना आपले दागिने दिले नसते तर सन २००६ मध्ये अमिताभ बच्चन तिरुपती बालाजीच्या चरणी ९ करोड रुपयांचा हार अर्पण करू शकले नसते.

त्यांना २०० फुटांची फिल्म तयार करण्यासाठी ४५ दिवस लागले. त्या फिल्म मध्ये एका रोपट्याची वृक्षात होणारी वाढ दाखवली आहे. दि.३ मे १९३१ रोजी "राजा हरिश्चंद्र" कोरोनेशन थिएटर मुंबई येथे दाखवण्यात आला तर त्यानंतर २ महिन्यांच्या आत "आलम आरा" मजेस्टीक सिनेमा इथे दाखवण्यात आला. हे दोन्ही चित्रपट हाउस फुल गेले आणि त्याचं पोस्टर आजही एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीकडे आहे. असं म्हटलं जातं की भारतीय स्वातंत्र्य संग्रामात भारताच्या चित्रपट व्यवसायाचा मोलाचा वाटा आहे. त्याने जनतेला जाणीव करून दिली की, तुमचं एक स्वतंत्र अस्तित्व, एक स्वतंत्र संकृती आहे. तुम्हाला स्वतःचं आयुष्य स्वतः घडवण्याचा हक्क आहे.

सन १९४७ मध्ये एक अभिनेत्री पहिली 'मिस इंडिया' बनली. तिचं खरं नाव एस्तेर व्हिक्टोरिया अब्राहम. "मदर इंडिया"चित्रपटातील ती एक पडद्यामागची कलाकार होती. हा पाहिला चित्रपट होता जो बकिंगहम पलेस मध्ये दाखवण्यात आला.

सन १९४८ मध्ये संपूर्ण देश विभाजन आणि वाटण्यांच्या जखमांनी त्रस्त झाला होता. या काळात चित्रपट उद्योग थोडा थंड पडला होता, पण याच थंडीतून निर्माण झाले नव्या धरतीचे, नव्या विषयावरचे चित्रपट, जसा "हम दोनो". या वर्षाला एम.एस.सुब्बुलक्ष्मी यांचे निधनाचे वर्ष म्हणूनही ओळखतात, परंतु त्यावेळी त्या चित्रपट जगतात कार्यरत नव्हत्या. भारतरत्न पुरस्करने सन्मानित झालेल्या त्या पहिल्या गायिका होत्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel