शहराजवळच्या वस्तीवर राहणार्‍या गाढवाचे शेपूट एके दिवशी कोठेतरी तुटून पडले.

शेपटी नसल्याने त्या गाढवाला स्वतःची फार लाज वाटू लागली. तो आपली शेपटी शोधण्यासाठी म्हणून हिंडू लागला. तो एका बागेतून चालला असता तेथील माळ्यास वाटले की हे गाढव आपल्या फुलझाडांची नासाडी करण्यासाठीच आले आहे. म्हणून तो रागारागाने त्या गाढवाच्या अंगावर धावून गेला व त्याने झाडे कापायच्या कात्रीने गाढवाचे दोन्ही कान कापून टाकले.

शेपूट हरवल्यामुळे आधीच दुःखी झालेल्या त्या गाढवाचे दोन्ही कान गेले म्हणून त्यास फारच दुःख झाले.

तात्पर्य

- दुःखाच्या भरात अविचाराने एखादी गोष्ट केली जाते व त्यामुळे जास्तच संकटे निर्माण होतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel