एका घरात काही धनगर बकरी मारून मोठ्या आनंदाने जेवत असता बाहेरून एक लांडगा त्यांच्याकडे डोकावून पाहू लागला. मग तो आपल्या मनात म्हणाला, 'वा रे वा ! ह्या धनगराने जर मला बकरी मारून खाताना पाहिले असते तर केवढा मोठा आरडाओरडा केला असता.'

तात्पर्य

- जे काम आपण निःशंकपणे करतो तेच दुसर्‍यांनी केले असता आपण दुसर्‍यांना दोष देतो. तर असे न करता दुसर्‍याच्या बर्‍या-वाईट कर्माचा जसा विचार करतो तसाच आपल्या कर्माचाही विचार करावा.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel