http://1.bp.blogspot.com/-D_NoYsj9SN8/VEyzOsbC4SI/AAAAAAAAC0g/NhMsG1P6ZeM/s1600/kalnemi.jpg

कालनेमि राक्षस रावणाचा विश्वस्त अनुयायी होता. तो भयंकर मायावी आणि क्रूर होता. त्याची प्रसिद्धी दूरदूरपर्यंत होती. रावणाने त्याच्यावर एक अतिशय कठीण कार्य सोपवले होते.
जेव्हा राम-रावण युद्धात लक्ष्मणाला शक्ती लागून तो बेशुद्ध पडला होता, तेव्हा हनुमानाला त्वरित संजीवनी आणायला सांगण्यात आले होते. हनुमान जेव्हा द्रोणाचलच्या दिशेने निघाले तेव्हा रावणाने त्यांच्या मार्गात विघ्न उपस्थित करण्यासाठी कालनेमीला पाठवले होते.
कालनेमीने आपल्या मायेने तलाव, मंदिर आणि सुंदर बगीचा बनवला आणि तिथेच एका ऋषीचे रूप घेऊन वाटेत बसला. हनुमानाने ते स्थान बघून तिथे जलपान करण्यासाठी थांबण्याचे ठरवले आणि ते तलावात उतरले मात्र, एका मगरीने त्यांचा पाय पकडला. हनुमानाने तिला मारून टाकले. मग त्यांनी आपल्या शेपटीने आवळून कालनेमीचा वध केला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel