विकट


भगवान विष्णूंनी जालंधर च्या विनाशासाठी त्याची पत्नी वृंदा हिचे सतीत्व भंग केले. त्यातून एक राक्षस उत्पन्न झाला. त्याचं नाव कामासूर. कामासुराने शिवाची उपासना करून त्रिलोकावर विजय प्राप्तीचा वर मागून घेतला. त्यानंतर त्याने इतर दैत्यांप्रमाणेच देवांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. तेव्हा मग साऱ्या देवतांनी भगवान गणेशाची आराधना केली. तेव्हा भगवान गणेशांनी विकट रूपाने अवतार घेतला. विकट रूपातील गणपती मोरावर विराजमान होऊन प्रकट झाले. त्यांनी देवताना अभय वरदान देऊन कामासुराचा पराभव केला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel