काही लोकांना चिंतेमुळे ह्रदयत धडधड होते तर काहींचे हात पाय लटपटायला लागतात. या सगळ्या आपल्या शरीराच्या प्रतिक्रिया असतात. जेव्हा माणूस मनातून खूप घाबरलेला असतो तेव्हा या प्रकारच्या क्रिया आपोआप घडतात. आपल्या मनात आलेला या भावनांना तुम्ही तुमची हर समजू नका. कोणताही न्यूनगंड मनात बाळगू नका यामुळे तुम्ही चांगली कामगिरी करू शकणार नाही आणि आपण एक चर्चेचा विषय व्हाल. आपल्या मेंदूतल्या काही नसा चांगल्या असतात. मेंदूतील ऍड्रेनेलीन उसळल्यामुळे आपल्याला घाम फुटतो हे अगदीच साधारण आहे. यात चिंतेची बाब नाही. उलटपक्षी ऍड्रेनेलीन आपल्याला अधिक सतर्क करतो. यामुळे आपण उत्कृष्ट कार्यक्षमतेने काम करू शकतो आणि  बिनदिक्कतपणे भाषण  देण्यास तयार होतो.

चिंता दूर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे भरपूर तयारी करणे, जोमाने तयारी करणे. आपण लिहून ठेवलेले मुद्दे बर्‍याच वेळा डोळ्याखालून घाला. आपल्या भाषणाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ द्या. एकदा आपण आपल्या लिखाणाशी सरावाचे झाल्यावर स्वत:चे व्हिडिओ रेकॉर्डिंग करा किंवा स्वतःच आपल्या कामगिरीचे समीक्षण करा. किंव्हा ते करण्यासाठी एखादा मित्र किंव्हा मैत्रीण शोधा जे तुम्हाला तुमच्या भाषणातल्या त्रुटी नजरेस आणून देतील.

एखाद्याला आपल्या चिंतेबद्दल सांगा. जर आपण उच्च माध्यमिक शाळेत असाल किंवा महाविद्यालयीन वर्गात असाल आणि तुम्हला वर्गासमोर बोलायचे असेल. तर आपल्या शिक्षक किंवा प्राध्यापकांना भेटा आणि आपल्या भाषणासाठीच्या भीतीचे वर्णन करा.

जर आपण प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेमध्ये असाल तर आपले भय आपल्या पालकांसह, शिक्षक किंवा मार्गदर्शक सल्लागाराला सांगा. कधीकधी आपल्याला कसे वाटते ते व्यक्त केल्याने स्टेजवरील भीतीला मात करणे सोपे होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel