बाजीरावांनी कोकणामध्ये  मानाजी आंग्रे यांना असलेली पोर्तुगीजांची दहशत शमवली होती . या बदल्यामध्ये आन्ग्र्यांनी बाजीरावांना वार्षिक खंडणीच्या स्वरुपात ७००० रुपये देण्याचे कबूल केले. बाजीरावांना हि पोर्तुगीजांसाठी सल्सेत्त नावाच्या टापूसाठी (मुंबईचा एक भाग , जो पोर्तुगीजांनी बाजीरावांना व्यापार धोरणाने कारखाना उभारणीसाठी भाडेपट्टी तत्वावर देण्याचे नाकारले होते.) तक्रार होतीच,  ज्याच्या धर्तीवर बाजीरावांचे बंधू चिमाजी आप्पा (मृत्यू १७४१) यांनी पोर्तुगीजांच्या क्षेत्रावर (मुंबई जवळील ) मार्च १७३८ मध्ये हल्ला केला. त्यांनी यशस्वीपणे , ठाणे, पारसिक, बेलापूर, धारावी, अर्नाळा यांना काबीज करत आपल्या विजयाचा शेवट वर्सोवा (फेब्रुवारी १७३९ ) आणि बसेन (वसई, मे १७३९ ) काबीज करून केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel