साक्षर झाला माणूस म्हणे
धडे अभ्यासाचे गिरवून गेले,
जातीपेक्षा थोर माणूसकी 
दुरूनच ते पेरून गेले...

गौतमासम शांती असावी
अनुयायी बोलून गेले,
संविधान बाळगून जवळी
हक्क आपले बजावून गेले...

अंधार आजही कायम आहे
कित्येक काळ संपून गेले,
गेले का जोडून आपसात
जातीय दंगलीत भांडलेले...

शिकवणारे शिकवितांना
अज्ञान माघे ठेवून गेले,
टेम्भा मिरवून मानवतेचा
जातीय विष कालवून गेले...

फुले आंबेडकर शिवबा त्यात
पोस्टर वरती एक झाले,
साक्षर झाला माणूस म्हणे
खंजीर माघे ठेवून गेले...

संजय सावळे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel