हनुमान हा अंजनी आणि केसरी ह्यांचा पुत्र आहे हे सर्वानाच ठाऊक आहे पण हे खूप कमी जणांना ठाऊक आहे कि राम जन्म आणि हनुमान जन्म ह्यांचा जवळचा संबंध आहे.

दशरथ राजाने पुत्रकामेष्टी यज्ञ आरंभला होता ज्यातून त्यांना दिव्य प्रसाद मिळाला. हा प्रसाद राजाने सर्व राणींना वाटून दिला. कौसल्याचा हातातून ह्या प्रसादाचा एक वाटा एक घारीने चोरून नेला. वायुदेवाने घारीच्या पकडीतून हा प्रसाद उडवून लावला आणि जथे अंजना ध्यानात बसली होती तिच्या हातावर टाकला.

अंजनाने हा दैवें प्रसाद समजून खाल्ला आणि तिला हनुमान झाला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel