https://kshetrapuranas.files.wordpress.com/2009/06/shiva-parvati.jpg?w=497

आपल्या कुमारसंभव महाकाव्यात पार्वतीच्या सौंदर्याचे वर्णन करताना कालिदासाने लिहिले आहे की विश्वात जेवढ्या काही सुंदर उपमा उपलब्ध असतील त्या सर्व एकत्र करून, मग त्यांना यथास्थान आयोजित करून विधात्याने पार्वती निर्मिली होती, कारण त्याला सृष्टीचे सर्व सौंदर्य एका ठिकाणी पहायचे होते. प्रत्यक्षात पार्वतीसाठी लिहिलेली कवीची ही उक्ती त्याच्या या कवितेला देखील तितकीच लागी होते. 'एकस्थसौन्दर्यदिदृक्षा' हे त्याच्या कवितेची मुल प्रेरणा आहे. या सिसृक्षा द्वारे कवीने आपली प्रतिभा विभिन्न रमणीय मूर्तीत वाटली आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel