समसुखांवाचुन द्वैतबुद्धीला हरीची समाधी साधत नाही.

समाधी हरीची सम सुखेविण । न साहेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥

दुजेपणाचा आभाव हेंच बुद्धीचे वैभव

बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एक्या केशवराज सकळसिद्धी ॥२॥

परमानंदांत मन नसेल तर रिद्धि सिद्धि ही अवघी उपाधिच होय.

रिद्धि सिद्धिनिधी अवघोच उपाधि । जंव त्या परमानंदी मन नाही. ॥३॥

सर्वकाळ हरीच चिंतन हेंच समाधान

ज्ञानदेव रम्य रमलें समाधान । हरीच चिंतन सर्वकाळ ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel