पहिली दोन वर्षे साधारण बरी गेली पण नंतर पहिले महायुद्ध सुरू झाले व मग सर्वच वस्तूंची भीषण टंचाई वाढत गेली व हाल होऊ लागले. दोन वर्षांनंतर त्याला शिष्यवृत्ति वाढवून मिळाली. मात्र युद्ध सुरू असल्यामुळे भारतात परत येणे शक्य नव्हते. केंब्रिजमध्येहि खूप बदल झाले. विद्यार्थी व अध्यापकही सैन्यात भरती होऊ लागले. नवीन विद्यार्थी कमी झाले. कॉलेजच्या आवारातच एक हॉस्पिटल सुरू झाले. जखमी सैनिक तेथे मोठ्या प्रमाणावर येऊ लागले. बॉंबहल्ले नव्हते पण वातावरण पूर्ण युद्धमय झाले..
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel