दैत्यांचे देवतांवर वाढत जाणारे प्रभुत्व आणि देवतांच्या शिव आराधनेद्वारा दैत्यांचा संहार, यांच्याशी निगडीत आहे लोकपालेश्वर महादेवाची कथा. पौराणिक कथांनुसार प्राचीन काळी हिरण्यकश्यपू द्वारा अनेक दैत्यगण उत्पन्न झालेले होते. त्यांनी वने, पर्वत इथे जाऊन आश्रम नष्ट करून संपूर्ण पृथ्वीवर उलथापालथ करून ठेवली. यज्ञ बंद पडले. वेदांचे ध्वनी ऐकू येईनासे झाले. पिंडदान देणे बंद झाले आणि पृथ्वी यज्ञ रहित झाली. तेव्हा लोकपाल (देवता) भयभीत होऊन भगवान विष्णूंकडे गेले हात जोडून आणि प्रार्थना करू लागले की हे प्रभू, तुम्ही या आधी देखील नमुचि, वृषभरवन, हिरण्यकशिपु, नरकासुर, मुरनामा यांसारख्या भयंकर दैत्यांपासून आमचे रक्षण केले आहे. कृपा करून या दैत्यांपासून देखील आमचे रक्षण करा. आम्ही तुम्हाला शरण आलो अहोत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel