दुर्वास ऋषींनी द्रौपदीला वाचवले होते?

एक अशीही रंजक कथा आहे जी सांगते की दुर्वास ऋषींनी द्रौपदीला वस्त्र हरणातून वाचवले. शिवपुराणात उल्लेख आहे की दुर्वास ऋषींनी दिलेल्या वरदानामुळे तिची त्या प्रसंगातून चमत्कारिकरित्या सुटका झाली. कथा अशी आहे की एकदा दुर्वास ऋषींचे वस्त्र नदीत वाहून गेले, तेव्हा द्रौपदीने चटकन आपल्या वस्त्राचा काही भाग फाडून त्यांना आपले अंग झाकण्यास दिला. यावर प्रसन्न होऊन दुर्वास ऋषींनी तिला एक वरदान दिले, ज्याचा प्रभाव म्हणून दुष्यासन तिचे वस्त्र फेडण्याचा प्रयत्न करत असताना तिची साडी न संपणारी झाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel