राघू
(गझल)
धर्मवरी हो चला । झुंज आज लागलें ।
धर्मबंधूंसाठीं या। देऊं आपुले गळे ।
गर्जनाकराउठा  । त्याग थोर या करूं ।
मोह सर्व सोडुनी । संकटास आदरूं ॥
भेदभाव जाळुनी । बंधु सर्व होऊं या ।
मायभूमि आपुली । सर्व मिळू सेवूं या ॥
भराभराचला चला । होमकुंड पेटलें ।
घेऊं त्यांत हो उडया । चित्त आज चेतलें ॥
पाश मायभमिचे ।  खंबुनी दुरी करूं ।
कष्टयोनि या तनू । धर्मकार्यि या मरूं ॥
देव आपुला सखा । पाठिशीं सदा खरा ।
व्हावया स्वतंत्र हा । मार्ग आपला बरा ॥

लक्ष्मीधरपंत -  वा, राघू ! अगदीं शुध्द म्हणतोस ! कुणी शिकवलं ?

राघू -  बालवीरांबरोबर शिकलों.

लक्ष्मीधरपंत -  खरेंच राघू, तुझ्या बालवीर शिक्षकांना बोलावून आण. त्यांच्याशीं माझें जरूरीचें काम आहे.

नारायण - (स्वगत) बालवीरांच्या संगतींत राघू बराच सुधारला. योग्य संगति व वळण जर मिळेल, तर हीं रानांत सुकून जाणारीं फुलें टवटवीत होतील, त्यांना आपा अस्पृश्य व बूध्दिहीन म्हणतों, पण त्यांची जोपासना केली, म्हणजे तिथेंच आपणांस हिरे मिळतील. त्यांची जोपासना करणारें शेंकडो लाखों निघाले पाहिजेत. (पांडबा येतो.)

पांडबा -  रामराम, दादा ! बरे आहेत ना नाना ?

लक्ष्मीधरपंत -  बरा आहे. आतां जरा अशक्तपणा आहे.

पांडबा -  मी राघूजवळ म्हटलं होतें कीं, मी आपल्या भेटीस येईन म्हणून !

नारायण -  त्यानं सांगितलें. राघू आतां येईल. (राघू व बालवीर शिक्षक येतात.)

लक्ष्मीधरपंत
-  या, मास्तर

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel