प्रवेश सहावा

(बालवीर - शिक्षक )

बालवीर शिक्षक -  सर्व बालवीर म्हणजे केवळ पोषाखी पोपट अशी टीका सर्वत्र ऐकू येते. तिच्यांत तथ्यहि आहे. कुणी हडेलहप्पी सरकारी अधिकारी यावा व त्याला यांनी ललकारी द्यावी, एवढंच जणूं यांचे काम ! पण मी हें सारं पालटणार आहें. बालवीर हा समाजाची सेवा करणारा वीर आहे. सेवाधर्माची, जनतेचें हित करण्याची त्यांना गोडी लागली पाहिजे. त्या दिवशी त्या खेडयांत जाऊन विहिरीभोंवती स्वच्छता वगैरे आम्हीं केली; तेव्हां गांवक-यांना आमच्याबद्दल कितीतरी कौतुक वाटलं! हल्लींच्या कॉल-याच्या दिवसांत नदीचे पाण पिण्यास नेऊं नये, म्हणून बालवीर तिथं निरोधन करतात; तेहि किती छान आहे! जाऊन पाहूं या तिकडे. पण एक अडचण आहे ! महारामांगांना निराळी विहीर नाहीं. नदीच पाण आम्ही त्यांना नेऊं देत नाही; काय करणार ! त्यांच्या भांडयांत हें औषण टाकून दिलं पाहिजे दोन दोन थेंब. तो नारायण, माहरांत जाऊन त्यांची सेवा करतो तशीच सा-यांनीं केली पाहिजे ! (शिट्टी वाजते, जातो.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel