अयोध्येला परतताना

युद्ध जिंकल्यावर रामाने सांगितले, "आता आपल्याला अयोध्येला परत जायचे आहे." एक भलेमोठे असे पुष्पक विमान बाहेर उभे होते जे मनाच्या आदेशावर चालत असे. जेव्हा सर्व लोक विमानात चढले तेव्हा बाहेर शिल्लक राहिलेल्या वानरांनी सांगितले की, "आम्ही या पुलावरून पायी चालत येणार नाही, आम्ही देखील विमानानेच येणार." तेव्हा प्रभू रामांनी विमानाला आदेश दिला की "आपला आकार वाढव." तेव्हा विमानाने आपला आकार वाढवला आणि सर्व वानर आत बसले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel