फल्गु नदीचा शाप

गया, बिहार इथे फल्गु या नावाची नदी आहे. या नदीत पाणी नाही पण या नदीत खोदले तर पाणी निघते. असं म्हटलं जातं की प्रभू राम इथे आपले पिता राजा दशरथ यांचे श्राद्ध करण्यासाठी आले आणि जेव्हा ते स्नान करत होते तेव्हा राजा दशरथाच्या आत्म्याने येऊन सीतेकडे भोजन मागितले. तिथे त्यावेळी काही अन्न उपलब्ध नव्हते म्हणून सीतेने नदीतील रेतीने पिंडाचा गोळा बनवून दशरथाला खाऊ घातला. जेव्हा प्रभू राम स्नानावरून परतले तेव्हा त्यांचा सीतेवर विश्वास बसला नाही. सीतेने आपले साक्षीदार - वडाचे झाड, गाय, तुळस आणि पंडितांना खरे सांगण्यास सांगितले. परंतु केवळ वडाच्या झाडाने साक्ष दिली. त्यामुळे सीतेने तिथे नदीला शाप दिला की ती गया इथे आपले पाणी हरवून बसेल. आणि तिने वडाच्या झाडाला अशी शक्ती दिली की ते मरणाऱ्यांना अर्पण केलेल्या भेटी स्वीकारू शकेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel