समारंभ संपला. उत्तीर्ण तरुण आनंदात होते. राजधानीतील सुखे भोगीत होते. इकडे तिकडे हिंडत होते, फिरत होते; परंतु शिरीष कोठे आहे ?

तो शीतला नदीच्या तीरी बसला होता.

तो पाहा हेमा आली.

‘तुम्ही पहिले आलेत, होय ना ?’

‘हो, आलो.’

‘तुम्हाला त्याचा आनंद नाही होत ?’

‘माझ्या आईबापांना खरा आनंद होईल.’

‘आणखी कोणाला होईल ?’

‘आणखी कोणाला होईल ?’

‘मला होईल. तुम्ही पहिले यावेत म्हणून मी जगदंबेची रोज पूजा करीत होते.’

‘तुमचा माझा काय संबंध?’

‘दुस-याचे कल्याण का इच्छू नये?’

‘परंतु मीच पहिले यावे म्हणून का तुमचा नवस? इतर कोणासाठी का केला नाहीत?’

‘मला नाही सांगता येत. मी जाते.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel