ती आता खिन्न दिसे. तिचे ते हसणे जणू अजिबात मेले. ऐके दिवशी ती एके ठिकाणी दळण्यासाठी गेली होती. ती दळीत होती. तिच्या डोळयांतून पाणी गळत होते, ते पीठात पडत होते. घरांतील सोवळया आजीबाईंनी ते पाहिले.

‘मधुरी, अग डोळयांतील पाणी त्या पीठात पडत आहे ना? सारे पीठ खरकट झाले. काय तरी बाई. पूस ते डोळे आधी. गरिबाच्या पोटी कशाला आलीस? दळावे लागते म्हणून रडावे? आचरट आहेस!’
मधुरीने डोळे पुसले. डोळयांतील पाण्याने भिजलेले थोडे पीठ बाजूला काढले.

‘आजीबाई, रागावू नका. आईला सांगू नका. सारे पीठ नाही हो खरकटे झाले. चिमूटभर बाजूला काढले आहे. आता न रडता दळते. असे ती म्हणाली. दळण संपवून ती घरी जात होती. तो वाटेत कोण? तो बुधा होता. आज कित्येक दिवसांनी तो घराबाहेर पडला होता. आणि मधुरीचे दर्शन झाले. त्याच्या हातात एक फूल होते. गुलाबाचे फूल.

‘मधुरी!’ त्याने हाक मारली.
‘काय बुधा?’ त्याने विचारले.
‘तू मला विसरली नाहीस?’
‘नाही.’

‘तू मला विसरणार नाहीस?’
‘नाही.’
‘तुझे माझ्यावर प्रेम आहे?’

‘हो.’
‘मग घे हे फूल.’
‘बुधा!’
‘काय मधुरी?’
‘मी ऐकले होते की, तू खोलीतून बाहेर पडत नाहीस; परंतु तू तर बाहेर दिसलास आणि हातात फूल घेऊन जात होतास. असाच आनंदी राहा. फुलांचा वास घे. तुला फुलांचा तोटा नाही. सुंदर सुगंधी फुले, त्यांचा तू भोक्ता हो.’

‘मधुरी!’
‘काय?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to तीन मुले


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
गांवाकडच्या गोष्टी
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय
खुनाची वेळ
गावांतल्या गजाली
शिवाजी सावंत
पैलतीराच्या गोष्टी
रत्नमहाल