एकदा प्राणी व पक्षी यांची लढाई व्हायची होती. त्यावेळी मासे व प्राणी यांचा असा तह झाला, की माशांनी पक्ष्याविरुद्ध प्राण्यांना मदत करावी. पुढे लवकरच लढाई सुरू झाली. पण त्यावेळी माशांनी असा निरोप पाठविला की जमिनीवर येऊन लढण्यास आम्ही समर्थ नाही.

तात्पर्य

- साहाय्य मिळावे म्हणून ज्यांच्याशी आपण मैत्री करतो त्यांच्याकडून आपल्याला किती साहाय्य मिळेल याचा विस्तार आधीच करावा. म्हणजे ऐनवेळी फजिती व्हायला नको.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel