एका शेतकर्‍याने एकदा एक डोमकावळा पकडला आणि त्याच्या पायात साखळी बांधून त्याने तो आपल्या मुलांना खेळायला दिला. तशा परिस्थितीत तो इतका कंटाळून गेला की एक दिवस तो त्या साखळीसकट रानात उडून गेला. परंतु, तेथे एका झाडाच्या फांदीला साखळी अडकल्यामुळे त्याला उडता येईना, भुकेने तडफडून मरण्याची त्याच्यावर वेळ आली. तेव्हा तो म्हणाला, 'अशा प्रकारे रानात भुकेने मरण्यापेक्षा, माणसाची गुलामगिरीसुद्धा पत्करली असती तर बरे झाले असते.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel