साळूच्या अंगावरचे बारीक काटे जर नाहीसे होतील तर तिच्या मांसावर ताव मारू , असे एका लांडग्याला वाटले. मग तो साळूजवळ जाऊन म्हणाला, 'शांततेच्या वेळी असं लढाई चालू असल्याप्रमाणे शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन राहणं बरोबर नाही. म्हणून मी तुला सांगतो की, तू हे आपल्या अंगावरचे काटे काढून टाक, तशी वेळ आलीच तर तुला ते पुन्हा धारण करता येतील.' त्यावर साळू म्हणाली, 'अरे, हल्ली सर्वत्र शांतता आहे, असं जरी तुला वाटलं तरी मला तसं वाटत नाही. जोपर्यंत तुझ्यासारखे लांडगे, माझ्या आसपास फिरताहेत, तोपर्यंत लढाई चालूच आहे असं समजून मी अशीच सज्ज होऊन राहणार.'

तात्पर्य

- शत्रूच्या भुलथापा ऐकून आपल्या हातातील शस्त्रे टाकून देणे, म्हणजे आपला जीव धोक्यात घालणे होय.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel