मी कल्पेश शिंदे

मी आज तुम्हाला माझ्या मित्रा सोबत झालेला 7 वर्षा पुर्विचा किस्सा शेअर करतोय ,

मी आणि माझा मित्र आकाश असेच एक दिवशी नुकतेच रात्र शाळेत गेलो होतो ; तशी ती शाळा फार जुनी होती . रात्री ठिक 8 : 00 ला आमचा पहिला इतिहासाचा तास सुरु झाला होता . त्या विषयाचे शिक्षक वर्गात आले , आम्ही दोघे जण नेहेमी प्रमाणे शेवटच्या बेंच वर बसलो , आणि अमचे लक्ष त्या विषया पासुन फार चलबिचल झाले कारण आम्ही दोघे सलग कधी सवय नसतानाही शाळे मागच्या विहरीत पोहायला गेलो होतो ; त्यामुळे आम्हाला आंगात ताप भरला होता . एन 10 विच्या वेळेस जर सुट्टी घेतली तर फेल होण्याचे चांस असायचे कारण तो आमच्या शाळेचा रुलच होता . वर्गात लक्ष नसल्याने आम्ही दोघे तसेच झोपी गेलो होतो . अशी सलग 2 तास होऊन गेली तरी आम्ही झोपेत च होतो ; शनिवार व आमावस्या असल्याने 10 : 30 शाळा सुटली आणि आम्ही झोपेतुन उठलो 11 : 15 ला रात्र तर भयान होती आम्ही कसेबसे उठलो व घरी जायला निघालो , शाळा घरा पासुन 3 कि.मी च्या आंतरावर होती . शाळा आणि घर यांच्या वाटेत 1. 5 कि.मी वर एक भयानक वाडा होता ; मला आणि माझ्या मित्राला तो वाडा नेहमी शाळेकडुन घराकडे जाताना व येताना लागत आसे , तो वाडा जुनाट आसल्याने तिथुन दिवसा ढवळ्या येताना काही नाही वाटत पण रात्री फार भीती वाटत आसे , गावकर्यांची आशी बोली असायची की तिथे एक म्हतारी रहायची , तिला रोज मटन व मांस खायची सवय होती . एके दिवशी तिच्या मुलाने कंटाळुन तिच्या मटनात विष कालुन ते मटन तिला खायला दिले व ती मरण पावली तिचा घडलेला हा प्रकार गावकर्यानी पाहिला व ती जाता - जाता तिच्या मुलाला नाही तर आख्या गावाला शाप दिला " तुम्ही सर्व याच वाटेवरून जाताना , ठिक आहे ,

आता या वाटे वरुन जो कोणी रात्री 11 नंतर फिरेल त्याला मी माझे भक्ष बनवेल " आसा वाईट शाप देउन त्या म्हतारीने प्राण सोडले ,

गावकर्यानी घडलेला प्रकार लक्षात घेताच त्या म्हतारी विषयी बोलायला लागली की येडी होती आणि काय पण बरळत , शाप देउन गेली ; येडपट कुठची , आसे म्हणत गावकर्यानी तो विषय लक्षात घेतला नाही . पण काहीच दिवसांत त्या म्हतारीच्या दृष्ट आत्म्याने आपला ईंगा दाखवयला सुरवात केली , ती दर आमवस्येच्या दिवशी येणार्या - जाणार्या ला आपल्या शिकारीत पकडायची , आश्या हा प्रकार गावकर्यानच्या लक्षात आल्याने गावकरी घाबरत त्या वाटे वरुन ये - जा करायची .

आम्ही सहज त्या वाटे वरुन जाताना मी आकाशला विचारले की ' आकाश किती वाजले आहेत . ' त्या प्रमाणे आकाश उत्तरला ' 11 : 07 ' हे एकताच आमची टर्र फाटली आम्ही दोघे धावत - धावत जात होतो आणि तो वाडा जवळ आला , आमच्या रुधयाची धडकन तेज वाढत चालली होती . आणि शेवटी तो प्रकार घडला जो नव्हता घडायला पाहिजे , त्या दृष्ट आत्म्याने आम्हाला आडवले व मोठ मोठ्याने आमच्याकडे बघुन हसायला लागली , आम्ही तिच्या कडे न पाहताच पळत सुटलो आणि पळत सुटता - सुटता ती आचानक आमच्या समोर आली आणि आम्हाला म्हटली " आता तुम्ही दोघे माझे भक्ष बनलात , मी तुम्हाला खाणार " एवढ्यात मी लगेच माझ्या दप्तरातील आंगारा घेतला व त्या आत्म्यावर भिरकावला व तिला त्यच्या मोठा झटका बसला ति एकदम लांब फेकली गेली आणि आम्ही मोका भेटताच पळत सुटलो आणि हानुमान चालिसा मंत्राचे पठण करत आम्ही दोघे त्या एरिआ पासुन फार लांब आलो . आणि काही वेळातच आम्ही आमच्या घरी पोहचलो आणि जेवण करुन झोपी गेलो , हा सर्व घडले ला प्रकार आम्ही आई - वडिलांना सांगितला व त्यानी त्यावर उत्तरले की त्या आत्म्याची दृष्ट शक्ती

फक्त आमावस्या लाच आसते ; ईतर दिवशी ती कधीच कोणाला त्रास देत नाही .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel