समर्थ आहे भारतभूमी, समर्थ सेनादळे

’सदैव असतो जय सत्याचा’ इतुके आम्हां कळे

लोकशाहिचे सदा समर्थक, आम्ही भारतवासी

शांतिप्रिय जन, स्नेह आमुचा सार्‍या जगताशी

हुकुमशाहिशी मात्र मित्रता मुळी न आम्हां जुळे

स्वातंत्र्यास्तव लढती, त्यांचे आम्ही पाठीराखे

चळे न अमुची निष्‍ठा, अरिच्या शस्‍त्राच्या धाके

अन्यायाची उखडून काढू, छाया, पाळे-मुळे

नसे कुणाशी वैर आमुचे, नको दुजी भूमी

तत्‍त्‍वासाठी साहाय्य होतो, दुबळ्यांच्या कामी

निरापराध्या होता पीडा, हृदय आमुचे जळे

विजयी सेना, विजयी जनता, विजयी जननेते

तरी न आम्ही, कधी आक्रमक कोणाचे जेते

समान सारे देश आम्हांला, सारी मानवकुळे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel