प्रशांतचा मूड तसा खराबच होता.

प्रशांतचे मन आजिबात थाऱ्यावर नव्हते. वाटेत त्याने त्याच्या अनेक मित्रांना फोन लावले. श्रेयाचे लग्न झाले होते आणि तिने तिच्या सासरच्या घराविषयी मजेशीर गोष्टी सांगून त्याला भरपूर हसवले हसून हसून त्याचं पोट दुखले. पण फोन ठेवल्यावरही प्रशांतच्या मनात वादळ चालूच होतं.

तो मनश्रीशी बोलला तेव्हा कळलं की ती लंडनला पत्रकारितेचा कोर्स करायला जाणार होती पण जायच्या आधी सर्व मित्र-मैत्रिणींना भेटून  ती पार्टी देईल असे तिने सांगितले. नेहाला फोन केला तेव्हा तिने सांगितले तिच्या लग्नाची तयारी सुरू होती आणि ती शॉपिंगमध्ये व्यस्त होती.

शेवटी प्रशांतने सोनलला फोन केला. एकेकाळी सोनलला प्रशांत खूप आवडायचा. पण प्रशांतचे मन तिच्याशी कधीच जुळू शकले नाही. सोनलशी गप्पा असताना एक क्षण आला आणि त्याने तिला भेटायचं वचन दिलं. इकडे प्रशांतच्या हृदयाचे ठोके वाढले. आपण सापळ्यात अडकू असं त्याला वाटले. पण फक्त भेटायला सांगून सोनल काही वावगं करणार नाही हे त्याला माहीत होतं. पण तरीही प्रशांतचं मन इतकं अस्वस्थ होतं की तिला भेटण्याच्या विचारानं तो थरथर कापला.

तेवढ्यात प्राचीचा व्हॉट्सअॅप मेसेज तिच्या फोनवर फ्लॅश झाला. प्रशांतने लगेच फोन ठेवण्याचा बहाणा केला आणि मेसेज वाचला – “सॉरी यार, मी गेल्या काही दिवसांपासून खूप अस्वस्थ होते. त्यामुळेच मी तुझ्याशी बोलू शकले नाही. रागाच्या भरात मी माझा फोन फ्लाइट मोडवर ठेवला. मी बाकी कोणाशीच बोलले नाही.".

"मी तुझ्या घरी आलो, इतका वेळ बसलो. तरीही तू बोलली नाहीस?"

“बोलले होते कि प्रशांत. तुझ्या समोर बसले होते. दुपारचे जेवण पण केले. तू काय बोलतोयस?"

"काय बोललीस तू? मी इतका वेळ बसून राहिलो, मला काय वाटलं असेल याची तुला कल्पना आहे का? एवढ्या दिवसांनंतर भेटूनही तुला असं वागावंसं वाटू शकतं?

“कसं वागले मी प्रशांत? माझ्या मन:स्थितीची तुला काही कल्पना आहे का? असो, मी तुला खूप त्रास दिला. मला माझ्या मित्राला आणखी त्रास द्यायचा नव्हता. त्यामुळे यावेळी मी माझे प्रोब्लेम स्वत:च सोडवण्याचा प्रयत्न केला.

“"नक्की काय प्रॉब्लेम आहे?"

“जतिनला माझ्या आयुष्यात परत यायचं होतं. तुला माहीत आहे की या गोष्टी माणसाला वीक बनवतात. तो रडू लागला, चुका मान्य करू लागला. घरी आला. लग्नासाठी हट्ट करत होता. तासनतास मम्मी पप्पाजवळ बसला आणि रडत होता. त्यांना त्याने वचन दिले की मी लग्न करून सेटल होईन आणि प्राचीला खुश ठेवीन. त्याच्या बोलण्याने पप्पा आणि मम्मीही पाघळले. पण खरं सांगायचं तर तो माझ्या मनातून उतरलाय. नेहमीचे वादविवाद बाचाबाची यांची पण रोजची सवय झाली होती. पण आता मला गुदमरल्यासारखे वाटू लागले आहे. शिवीगाळ करणे, हात उचलणे मला हे आता सहन होत नाही.  ”

"मग?"

“मग काय, जतीनला मी स्पष्ट नकार दिला. याच दरम्यान आणखी एक गोष्ट घडली. मी तुला सांगू शकले नाही. तुच काय, आईशिवाय मी कोणालाच सांगू शकले नाही.”

"मला एक मुलगा आवडायला लागलाय."

"कोण?"

"तू ओळखतोस त्याला."

"नाव सांग."

“अनिमेष।”

"अरे वा! चांगला मुलगा आहे तो. पण प्राची मला एक सांग."

"काय?"

"माझ्यात काय कमी आहे?"

"काहीच कमी नाही. तू एक क्यूट आणि परफ़ेक्ट व्यक्ती आहेस. तु कोणालाही आवडू शकतोस."

"पण तुला मी का नाही आवडत?"

“प्रशांत, मला तू नेहमीच आवडला आहेस. मी तुला माझा बेस्ट फ्रेंड मानते. मला तू आवडत नाहीस असे कोण म्हणाले तुला?”

"प्राची, तू हे बरोबर केले नाहीस."

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel