“उदय, थट्टा काय करतोस?”

“नलू, श्रीमंतांची लग्ने जमतात व गरिबांची जमत नाहीत वाटते?”

“तुझ्या डोळयांवर केलेली कविता तुला आवडली का?”

“मी ती फाडून टाकली.”

“का?”

“माझ्या डोळयांवर कविता करण्याचा हक्क तुला नाही.”

“मग कोणाला?”

“सरलेला.”

“कोण रे ही सरला? तुझी बायको वाटते? लग्न मनात लागले की जनात?”

“मनात लागले. जनातही लागल्यासारखे आहे.”

“नलू, चल; तिकडे बाबा बोलावीत आहेत.”

नलू व बंडू निघून गेली. उदय तेथेच होता. त्याची गाडी लगेच येणार होती.

ती पाहा आलीच भुसावळकडे जाणारी गाडी. गर्दी झाली. उदय डब्यात शिरला. ती पाहा नली आली. धावत आली.

“उदय, उदय !”

“काय?”

“ही घे चिठ्ठी, आपली पुन्हा भेट होणार नाही. तुझी आई दोन दिवसांची सोबती ! मग तू कोठे जाशील? मी कोठे असेन? परंतु कोठेही असलो तरी कधीमधी एकमेकांस आठवू. तुझ्या डोळयांवर मी कविता करीत राहीन. त्याचा राग नको मानू. मी तुला न कळता दुरुन हा हक्क बजावीन. जा, सुखी हो. आई भेटो.”

शिट्टी झाली, गाडी निघाली. नली उभी होती, ती आता दिसेनाशी झाली. उदयने ती चिठ्ठी वाचली. काय होते तीत?

“उदय,

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel