माधव खूप घाई घाईत ,सायकलवरून घरा कडे
जात होता ,,चेहर्यावरुण
घामाच्या धारा लागल्या होत्या पण
त्याला त्याची पर्वा नव्हती ,कारण
आजचा दिवस त्याच्या साठी खूप
आनंदाचा होता ,अन त्याला कारणही तसेच होत,
आज त्याला नोकरी लागली होती .शहरातून
त्याला नोकरी मिळाल्याची तार मिळाली होती.अन
त्याच खुशीत तो जोर जोरात सायकलचे पेंडल
मारत घराकडे धाव घेत होता,
कधी एकदाचा तो ही बातमी आई –बाबा अन
अर्थात
त्याची लाडकी पत्नी वृषालीला सांगतो असे झाले
होते.
कथेचा नायक आहे माधव.
“माधव एक साधा सरळ,
एका अगदी छोट्याश्या खेड्यात गावात
वाढलेला तरुण,त्या काळी तो मॅट्रिक पास
झाला होता ,गावात एकमेव तोच
होता जो ईतका शिकला होता अन आता शहरात
नोकरी साठी चालला होता.त्यामुळे गावात तो एक
चर्चेचा विषय बनला होता.कारण
त्या काळी शहरात नोकरी असणे म्हणजे आमदार
असल्या सारखी गोष्ट होती !”
घरात तो अन त्याचे आई बाबा ,अन
त्याची पत्नी असा छोटासा सुखी परिवार
होता ,नुकतेच एक महिन्या पूर्वी माधवचे अन
वृषालीचे लग्न झाले होते ,वृषलीचा माधव वर खूप
जीव .अन तेव्हाडच जीव माधवचा पण
होता तिच्या वर..स्वभावाने
सरळ,सोज्वळ ,काळी सावली पण
नाकी डोळी नीटस
अशी वृशाली अगदी माधवला शोभेल अशीच
होती..
माधव घरी आला अन त्याने
ही आनदाची बातमी सर्वांना सांगितली .सगळ्यांना खूप
आनंद झाला .अन खास करून वृषलीला कारण
तिला शहर बघण्याची खूप इछा होती ,अन
शहरात तिला अन माधव ला थोडा एकांत
ही मिळणार होता म्हणून तिला थोडा जास्तच
आनंद झला.पण तिला कुठे माहीत होते
की ती ज्या सुखा साठी ईतकी आतुर होत आहे
तेच तिच्या साठी घातक ठरणार आहे म्हणून .!”
पुढच्याच आठवड्यात माधव ला नोकरीवर हजर
व्हायचं होत,म्हणून त्याने लगेच
तयारी करायला सुरवात
केली .एका मित्राला भेटून त्याने शहरात एक घर
बघितल.नोकरीच्या जागे पासून थोड दूर होत पण
कमी पैशयात मिळाल म्हणून त्याने ते भाड्याने
घेतल.सगळी बोलणी करून अन भाड्याचे पैसे
देऊन तो पुन्हा गावा कडे निघाला.त्याच्या मनात
खूप सारी स्वप्न रंगत होती.अन ती कधी अन
कुणा साठी पूर्ण करायच हे
माधव,मनातल्या मनात विचार करत होता..पण
म्हणतात ना की माणूस जो विचार
करतो नेमका देव त्याच्या उलट करत
असतो..पण ह्याची जाणीवही माधव अन
वृषलीला नव्हती..दोघेही आपल्या मनाने जणू
दुखाच्या दरात निघाले होते.. असो
घरी पोहचून त्याने,घरातील सर्व आवारा आवर
केली ,खरे तर तो सर्वांना सोबत शहरात घेऊन
जाणार होता पण त्याचे आई वडील नाही म्हटले
कारण त्यांना गावातच राहायचे होते.
त्यांच्या मनाचा विचार करून आणि
सगळ्यांचा निरोप घेऊन माधव अन
वृशाली ,शहराकडे निघाले ,शहरात
पोहाचायला त्यांना जवळजवळ सहा वाजले
होते ,माधव ने आधीच पाहिलेल्या घरी ते
आले,घरा समोरच त्यांनी त्यांचं सामान
उतरविले .अन मग त्यांनी घरं कडे बगितले ..खूप
जुनाट पद्धतीचे ते घर होते मातीचे ,अन
त्या काळाचे स्ल्याप असलेले म्हणजेच धाब्याचे
घर होते..पण ते थोड जास्त उंच होत
आजूबाजूच्या घरांपेक्षा.पण आजूबाजूलाही दोन
तीन घरे होती अन ती ही पूर्ण ओस
पडलेली होती .त्यात कुणी राहत नव्हते .
वृषलीला ते घर थोड विचित्र वाटल पण तिने
विचार केला की नवीन जागा आहे म्हणून
असा वाटत असेन ,तिने तो विचार मनातून काढून
टाकला. अन
त्यांनी घर उघडून आता प्रवेश केला,घरात खूप
सारा कचरा होता ,धूळ होती..कारण खूप
वर्षापासून त्यात कुणी राहत नव्हते.पण घर खूप
मोठे होते ..म्हणजे एक रेल्वेच
होती ती ,एका मागून एक अश्या पाच
खोल्या सगळ्यांची दारे एका समोर एक,
सगळ्यात महत्वचे म्हणजे त्या पाच
पैकी शेवटच्या चार खोल्यांवर
भला मोठा माळा होता पुरुषभर उंच
असलेला ..आता त्यांना समजले
की घराची ऊंची ईतकी जास्त का आहे ते.
त्या वेळी त्या घरात वीज नव्हती अन माधव
ची ऐपत पण नव्हती की घरात वीज लगेच घेईल
म्हणून ,अन तसे पण त्याला अंधारातच
राहायची सवय होती म्हणून काही प्रश्न
नव्हता ,अन ह्या बाबतीत वृशालीची पण
काही हरकत नव्हती,त्यामुळे चिमणी अन कंदील
अन दिवे ह्याच्या प्रकाशावरच वरचे ते खुश
होते.
पण ते मातीने सरवलेले घर ,रात्रीच्या अंधारात
अन त्या दिव्याच्या प्रकाशात खूपच उदास अन
भयानक वाटत होत..आपलीच
सावली समोरच्या भिंतीवर मोठी होऊन दिसत
होती अन आपल्यालाच घाबरवत होती..
त्या रात्री त्यांनी फक्त
समोरची खोली झाडून ..सोबत आणलेले
मिरची भाकरीचे जेवण करून झोपून घेतलं.
सकाळी लवकर उठून वृषलीने माधव साठी जेवण
तयार करून त्याला कामावर पाठवले,अन मग तिने
सर्व घर एकदा दिवसाच्या उजेडात नीट पहिले ,
पहिली खोली(आपण हॉल म्हणूया ) अन
त्यानंतरच्या तीन खोल्या(बेडरूम)
मोकळ्या होत्या ,सगळ्यात
शेवटची खोली स्वयपक(किचन) घराची होती याच
खोलीतून वर माळ्यावर
जाण्या साठी पायर्या होत्या ,ती त्या पायर्या वरुण
हळू हळू वर जाऊ लागली ,पण
तीला त्या माळ्यावर काहीच दिसेना .कारण
सगळी कडे घुप अंधार होता म्हणून मग
तिने .कंदील पेटवून आणला ,अन हळू हळू एक एक
पाऊल ती त्या माळ्यावर टाकू लागली खर तर
तिला त्या माळ्या वर खूप विचत्र वाटत होत
पण तरी ती मनाची समजूत घालून ईकडे तिकडे
बघत होती,,तिला एक गोष्ट समजली के
खालच्या खोल्यांच्या आकारा पेक्षा हा माळा खूपच
मोठा आणि लांब आहे ,,पण अचानक
तिला अंधारात काही तरी चमकताना दिसलं म्हणून
मग तिने थोड पुढ जाऊन बघितल तर अंधारात
एक .मोडलेली खुर्ची होती अन तिला डोर बांधलेले
होते शेजारीच
कही जुनी भांडी होती जी गजलेली वाटत
होती,काही जुनी कुजलेली कापड
तिला दिसली ,अजूनही बर्यच वस्तु होत्या पण
त्या नीट बघण्या अगोदरच ,तेथील वातावरण
बदलू लगले त्या जागेत अचानक
थंडी वाजायला लागली ..अन कसला तरी आवाज
येऊ लागला पन नेमका कशाचा आवाज आहे हे
तिला समजले नाही तिने घाबरून तिथून पळ
काढला.खरे तर तिला तो संपूर्ण
माळा बघयचा होता .पण ती अर्ध्याच बघू
शकली कारण पुढे खूप अंधार होता..
ती पूर्ण पने घाबरून घामाघूम झाली होती, भीतीने
तिची गाळण उडाली होती पण तिने तरीही हे
मनाचे खेळ आहेत ,अन अश्या अंधार्य
जागी आपल मन नेहमी भीती घालत असतं
असा विचार तिने केला ,अन
दुसर्या कमला लागली ..तिने सर्व खोल्या नीट
स्वछ केल्या,सगळी धूळ तिने बाहेर काढली अन
मग तिने सोबत आणलेले सर्व समान नीट घरात
लावले ,पण काही समान हे थोड बिन कामच
होता जे लवकर लागणार नव्हते म्हणून मग तिने
ते सामान माळ्यावर ठेवण्यचा निर्णय
घेतला.पण काही केल्या तिची पावले तिकडे वळत
नव्हती..पण तरी तिने खूप हिम्मत करून ते
सामान माळ्याच्या पायर्या पासून थोडा दूर ठेवून
पटकन खाली आली ,त्या माळ्याच्या अंधार्य
भागात बघण्याची तिची हिम्मत झाली नाही,पण
तिला का कुणास ठाऊक अस वाटल
की तिला त्या अंधार्य भागातून कुणी तरी बघतय
खुनशी नजरेने .कुणी तरी आहे त्या अंधार्य
जागेत जे लपून बसले आहे पण
आपल्या डोळ्यांना दिसत नाही,
संध्याकाळी सहा वाजता माधव
घरी आला ,तो खूप दमला होता,वृषलीने
त्याला पाणी दिले तो थोडा वेळ बसला मग
त्याने हातपाय तोंड धुवून सर्व घर पहिले अन
वृषलीला बोलला.
“अरे वा ! तू तर घराचा चेहराच बदलून
टाकलास.मस्त हा एकदम !.आता खुठे हे
आपला घर वाटत आहे !”
“वृशाली लाजली अन बोलली की हे
माझ्या स्वप्नातील घर आहे पण ...!”
“पण काय !” माधव बोलला
“पण माला ह्या घरातील
हा माळा नाही आवडला ,थोडा विचित्र आहे
तो ,दुपारी मी वरती गेली होती पण
ना कुणी तरी आहे अस वाटल मला त्या अंधारात
अन सारखं माझ्या कडे बघतय अस वाटत
होत,!” वृशाली ने सगळं खर खर सांगून दिल .
पण
हे ऐकून ,माधव मोठ मोठयाने हसू लागला अन
बोलला ,काय लहान मुला सारखी करतेस ग
तू ,काही पण तुझ म्हणे माळ्यावर
कुणी तरी आहे ,छे ,
ये ईकडे मी दाखवतो कुणी आहे का तिथे
तुला ,माधव ने कंदील पेटवून उचलला ,अन सरळ
जिन्या जवळ
गेला,वृशाली त्याला थ्ंबवायचा प्रयत्न करत
होती,पण माधव तीच काही न ऐकता सरल
माळ्यावर गेला ,वृशाली फक्त
माळ्याच्या तोंडा पर्यन्त जाऊन
त्याच्या पाठमोर्या आकृती कडे बघत
होती ती थोडीशी घाबरलीच होती ,माधव
माळ्यावर गेला जस जसा तो दूर
गेला वृषलीला कंदिलचा प्रकाश
दिसेनासा झाला ,वास्तविक बघता फक्त चार
खोल्यांवर तो माळा होता पण
त्या एव्हड्याश्या जागेतही तो प्रकाश
नाहीसा व्हावा याच तिला खूप आश्चर्य
वाटल,थोड्याच वेळात माधव परत आला ,अन
तो बोलला
“बघ मी माळ्याचा कोना न कोना बघून आलोय,
साधी मुंगी पण नाही इथ,चल आता .स्वायपक
कर खूप भूक लागली आहे “वृषली गप्प बसली,
वृशाली स्वायपकला लागली चूल
खोलीच्या एका कोपर्यात
होती ,आणि वृषलीची पाठ भिंतीला होती व
चेहरा समोर होता माळ्याच्या पायर्यांकडे,
चुलीवरच्या देवलीत दिवा होता अन
त्याच्या प्रकाशात ती स्वायपक करत
होती ,पण राहून राहून तिची नजर
त्या पायर्यांवर जात होती,माधव ही कुठे बाहेर
गेला होता,पण
तिला त्या पायर्या बघितल्या की असे वाटे
की कुणी तरी माळ्यावरून आलय अन
पायर्यांच्या टोकावर येऊन तिला वाकून बघत
आहे.तिने कसं बस जेवण तयार
केल.आणि घरच्या बाहेर पळली.तेव्हड्यात
माधवही आला ,
जेवण करून ,ते दोघेही मधल्या खोलीत झोपले
होते,कंदिलचा प्रकाश अंधुकसा होता .त्यात ते
जुन्या काळाचे इतके मोठे मातीचे घर अन वर
तो माळा,माहीत नाही ह्या घराने काय दिवस
पहिले असेल .वृशाली विचार करत होती .
वृषलीला काही केल्या झोप येत
नव्हती ....ती एकटक माळ्या कडे बघत
होती ,अन मग अचानक एक शांतता पसरली.अन
माळ्या वरुण काही तरी आवाज येऊ
लागला ,माधव तर कधीचाच झोपला होता,कारण
तो दिवसभर खूप
थकला होता .वृषलीला आधी वाटले
की हा आपला भास आहे ,पण नंतर तिने नीट कान
देऊन.एकले तेव्हा तिला असे वाटले
की कुणी तरी म्हातार माणूस माळ्यावर चालत
आहे काठी टेकून.तीला तो आवाज आता खूप
स्पष्ट पने येत होता ,पण मग अचानक तो बंद
झाला.
त्या रात्री वृषलीला कधी झोप लागली हे
तिच्या तिला समजले नाही
सकाळी उठून
जेव्हा ती ह्या रात्रीच्या घडलेल्या गोष्टीचा विचार
करू लागली तेव्हा तिला नीट काही समजत
नव्हते .की ते स्वप्न होत की खरच अस
काही झाले होते.?
तिने तो विचारच मंनातून झटकून
टाकला आणि ,रोजच्या कामला लागली ,माधव
लवकर उठून कामावर गेला होता अन
आता पुन्हा ती त्या भल्या मोठ्या घरात
एकटी होती,ते घर तिला खायला येत
होत.त्या घरात एक भयाण शांतता होती.अन ते
घर ज्या परिसरात होत
त्या भागातही कुणी राहत नसे ..त्यामुळे
तीला कुणाशी बोलताही येत नसे .
कितीही ठरवलं की त्या माळ्याचा विचार
नाही कारयचा तरी राहून राहून तिच्या मनात तेच
तेच विचार पुन्हा पुन्हा येत होते .अन ते विचार
मनात येताच ती आणखी घबरात होती,म्हणून मग
तिने स्वताला कुठल्या तरी गुंतवून ठेवायचं
ठरवलं,तिने वीण काम करायच ठरवलं..पण
त्या साठि लागणार समान तिने अडगळ म्हणून
माळ्यावर ठेवलं होत.पुन्हा तो माळा समोर
आला.का कुणास ठाऊक पण
पुन्हा पुन्हा तो माळा तिला आपल्या कडे खेचत
होता,.तिने तो विचारच मनातून काढला अन
तिने पट पट स्वायपक घरातील कामे आवरून
घेतली ,अन पुढच्या खोलीत येऊन बसली.
कसं बसा तिने तो दिवस त्या खोलीत एकटीने
काढला ,संध्या काळी माधव घरी येताच त्याने
तिला विचारलं
“ मग काय कसं
गेला आजचा दिवस ..आला का कुणी माळ्या वरुण
खाली की नाही ?”
तो तिची टिंगल करत म्हणाला.
पण ती खूप घाबरलेली असल्यामुळे काहीच
बोलली नाही हे ,माधव ला समजले
तेव्हा तो तिला पुन्हा समजावत बोलला की “ग
वेडा बाई,अस काही पण मनात नको आणूस
काही नाही आहे तिथं हे सगळे तुझ्या मनाचे खेळ
आहेत ,”
या वर वृशाली बोलली की, “आपण दुसर घर बघू
न .छोटा चालेल पण हे नको .”
त्या वर माधव बोलला की “हे बघ ,आताच आपण
इथ आलोय .हेच घर मला कसं बस मिळालं ,अन
लगेच आपल्याला दूसरा घर मिळणे मुश्किल
आहे ,थोडे दिवसानंतर आपण दुसरी खोली बघू .”
वृशाली या वर काहीच न बोलता नुसती मन
डोलावली ,नेहमी सारखी ती स्वायपक घरात
चुली वर स्वायपक करत होती शेजारीच
कंदिलचा प्रकाश पडत होता, अन अचानक
तिची नजर समोरच्या माळ्याच्या वरील
शेवटच्या दोन पायर्यांवर गेली आण तिला एकदम
धक्काच बसला ,,तिने तिथे दोन पाय बघितले
अतिशय घाणेरडे .काळे जळलेले ,अन ती एकदम
ओरडून उठली ,तिचा आवाज एकून माधव .पळत
पळत तिथे आला ,आण तिला विचारू
लागला की काय झाल.?
ती इतकी घाबरली होतिकी तिला बोलता पण येत
नव्हते ती नुसतेच त्या पायर्यांकडे बोट करत
होती...माधव तिकडे बघत होता पण त्याला तिथे
काहीच दिसले नाही ,त्याने तिला पानी पाजून शांत
केला अन नीट विचारलं की काय
झाला.तेव्हा वृषलीने त्याला सांगितलं की तिने
तिथे दोन जळलेले पाय बघितले..पण
याही वेळी माधव ने तिलाच समजाऊन संगितले
अन तिलाच गप्प केले. “
“पण आज त्याच मन म्हणत होते
की ,मी तिच्या वर
त्या दिवशी थोडा जारी विश्वास ठेवला असतं
तर आज मला हा दिवस बघवा लागला नसतं पण
देव ऐन वेळी बुधि देत नाही हेच खरे.”
दिवस उजाडला ,अन वृषलीने पुन्हा आपली कामे
सुरू केली पण ती आता त्या स्वयंपाक घरात खूप
कमी वेळ थाबत होती ,कारण राहून राहून तिला ते
दोन पाय तिच्या समोर येत
होते ...दुपारी ती घरात
एकटी बसली असताना .तिला पुन्हा तोच
तो कुणी तरी माळ्या वर चालण्याचा आवाज
आला..अन आता तर
तिला कुणाचा तरी घोगरा आवाज पण
आला.तो आवाज एका स्त्री च होता,,
“वृशाली बेटा ,पानी देतेस का ग थोड ?. खूप
तहान लागलीय ग मला ! “
असा आवाज आइकून
वृशाली आणखि घाबरली,अन घरं बाहेर ,जाऊन
दिवस भर झाडं खाली बसली तिला खूप रडू येत
होत .अन त्या बाई चा आवाज
तिला अजूनही येत होता तेच ते वाक्य
पुन्हा पुन्हा ती बाई म्हणत होती.
वृशाली खूप असहया समजत
होती स्वताला ..कारण त्या घरं जवळ आस पास
कुणाचेच घर नव्हते की ज्यात कुणी राहत असे
जणू काय सगळी घरे लोक सोडून निघून गेले
आहेत.
संध्याकाळी माधव घरी आला ,अन त्याने
वृषलीला बाहेर पहिलं तर त्याने
विचारायच्या आत वृषलीने सर्व गोष्ट
त्याला सांगितली ,ह्या वेळी माधव मात्र खूप
चिडला .अन तिलाच
पुन्हा एकदा बोलला ,एव्हड्यावर्च तो न
थ्ंबता त्याने तिचा हात पकडून माळ्यावर घेऊन
गेला ..ती खूप प्रतिकार करत होती पण
त्याच्या तकातीपुढे ती हतबल झाली. त्याने बळ
बळ ओढत माळ्यावर नेल. अन बोलला
-“ बघ कोण आहे एथ ते दिसतय
कुणी तुला एथे ?...एक नाही दोन कंदिल
लावतो मी, म्हणजे तुझ मन साफ होईल..
“वृशाली सारखी रडत होती अन खाली जाण्याचं
प्रयत्न करत होती पण माधव तिला सोडत
नव्हता,त्याच्या
रागाचा पारा इतका वाढला की त्यांनी तिला तशीच
माळ्यावर सोडलं
आणि बोलला की तुला असा नाही समजणार थांब
आणि त्याने तिला तिथच सोडून घराचे दरवाजे
लावून बाहेर निघून गेला,खरे तर त्याला हे करायचं
नव्हते पण तिच्या मनातील
भीती काढण्या साथी त्याने हे पाऊल उचलले
होते .त्याला वाटले की एक तास एथे घरात बंद
राहील तर आपोआप तिला समजेल की एथे कुणीच
नाही आहे ,
माधवच्या मागे दारा पर्यन्त
वृशाली जीवाचा आकांत करत रडत पळत
आली पण तो पर्यन्त घराचे दार लागले होते
आणि ती घरात कैद झाली होती .घरात
सगळी कडे अंधार होता आणि ती एकटीच
होती.तिला काहीच सुचत नव्हते ,तिला दरदरून
घाम फुटला होता ,अंधारा मुले तिला काहीच दिसत
नव्हते ,ती माधव ला हाक मारून मारून थकून
गेली पण माधव केव्हाचा निघून
गेला होता ,तिला त्या अमानवी घरात
एकटीला सोडून.
वृशाली रडत होती ,आणि अचानक
तिला तो आवाज आला,कुणी तरी माळ्यावरून
चालण्याचा ,,तिला दिसत काही नव्हते पाण
तिला आवाजाचा अंदाज येत होता .तो आवाज
हळू हळू माळ्यावरून स्वयंपाक घरच्या दिशेने
जात होता म्हणजे पायर्यांकडे येत
होता ,,वृषलीने घाई घाई मध्ये कंदील
लावला तिच्या आस पास प्रकाश झाला ,तिने
त्या प्रकाशात बघण्याचा प्रयत्न केला पाण
तिला दूरचे काही दिसत नव्हते ,सारखे
तिला वाटत होते की कुणी तरी येते .पाण कोण हे
तिला माहीत नव्हते.तो आवाज आता स्पष्ट पने
येत होता,तिने हिम्मत करून स्वयंपाक घराकडे
चालू लागली.तिच्या हातात कंदील होता एक
खोली ओलांडली की मागील सर्व खोल्यात आंधर
परतत होता.वृषलीची सावली मोठी होऊन
त्या भिंतीवर पडत होती,चालत चालत
ती स्वयंपाक घरच्या दाराजवळ
आली ,तो आवाज अजूनही येत होता,आणि तिने
पुन्हा ते जळलेले पाय पहिले एक पाय
पायरी वरुण खाली येताना दिसला तशी वृषलीने
कंदील फेकून दरवाज्या कडे धाव घेतली ,मोठ
मोठयाने ती माधव ला हाका मारत होती पाण
तिला आइकणारे तिथे कुणीच
नव्हते,आणि एका एकी तिची एक
मोठी किंचली आली आणि मग सर्व शांत झाल.
तीन चार तासांनी ,माधव परत आला ,त्याले
वाटत होता की एव्हान
वृषलीची भीती कुठल्या कुठे पळली असेल.अन
त्याला थोडा राग पाण
आला होता स्वतचा की मघाशी आपण
वृषलीला नको नको ते बोललो ,पण
तो तिची माफी मागणार होता आणि,
तिची समजूत काढणार होत,
त्याने दाराची कडी काढली घरात सगळी कडे
आंधर होता ,त्याने वृषलीला आवाज दिला पाण
काहीच हालचाल दिसली नाही ,त्याने पुन्हा आवाज
दिला ,पाण काही उपयोग नाही झाला.तो चाचपडत
स्वयंपाक घराकडे
गेला त्याच्या पायाला कहितरी लागले त्याने ते
उचलले तर तो कंदील होता त्याने
तो पेटवला ,त्याला वाटली की वृशाली आपल्यावर
रुसली आहे म्हणून बोलत
नसावी त्यांनी कंदिलच्या प्रकाशात सर्व
खोल्या पहिल्या पाण वृषलीचा कुठेच
पत्ता नव्हता ,शेवटी त्याला वाटले की टी वर
माळ्यावर असेल म्हणून तो वृषलीला हाका मारत
माळ्यावर चढू लागला,त्याला कसला तरी उग्र
जाळलेल्या मासाचा वास
आला ,सडलेल्या मांसाचा,तो नाक दाबून एक एक
पाऊल पुढे टाकत
होता .त्याला त्या ठिकाणी खूप विचित्र वाटत
होता हवेत खूप
गारवा होता ,,आणि तो थोडा घाबरलाही होता कारण
वृशाली अजून त्याला सापडली नव्हती ,त्याला दूर
कंदिलच्या प्रकाशात काहीतरी चमकताना दिसले
तो धावत धावत तिथे गेला आणि बघतो तर काय
त्याची प्रिय वृशाली रक्ताच्या थारोळ्यात
पडली होती ,तिच्या शरीराची चिरफाड
केली होती.डोळे काढून टाकले होते ,छाती फाडून
त्यातील हृदय बाहेर पडले होते,टी वृशाली आहे
म्हणून ओळखूही येत नव्हती ,,तिला बघून माधव
मोठ मोठयाने रडू लागला त्याने तिला मिठीत
घेऊन मदाटी साथी ओरडू लागला पाण
तो विसरला होता की त्या भागात आता कुणीच
नव्हते ,,रडता रडता अचानक माधव गप्प
बसला ,आणि तो त्या माळ्यावर फिरून
शिव्या देऊन ओरडू लागला
“अरे माझ्या बायकोला मारतोस ,कोण आहे रे तू
भुता,खवीस ,समंध,पिशाच ,आता कुठ लपून
बसलास रे ये बाहेर हिम्मत असेल तर मार
माला ,माझ्या भोळ्या बायकोला मारलेस ,”माधव
बेभान होऊन शिव्या देत होता एकडे तिकडे बघत
होता जणू त्याला काहीच समजत
नव्हते.वृषलीच्या मृतू ने त्याला वेड केल
होता आणि आता त्याला फक्त एकाच गोष्ट
हवी होती ती म्हणजे वृषलीला ज्याने कुणी मारले
त्याचा जीव.
अचानक माळ्यावर पुन्हा तो काठीचा आवाज
येऊ लागला माधव त्या दिशेने बघत
होता ,,आणि त्याने कंदिलच्या प्रकाशात जे
बघितले ते तो आयुष्य भर विसरणार नाही,
एक म्हातारी पूर्ण पांढरे केस हातात काठी पूर्ण
शरीर जळलेले,सुजलेले,जागो जगून
जखमा आणि त्यातून पू बाहेर येत होता,पूर्ण
शरीरात किडे पडले होते ,चेहरा इतका विद्रूप
की पहातनही भीती वाटत
होती.आणि ती म्हातारी बेसुर्य आवाजात हसत
हळू हळू पुढे येत
होती तिच्या अवती भवति अजूनही कुणी तरी होत
खूप भयंकर श्कतीमान असणार वलय त्याच्याच
धुंदीत घुमणार आणि जीव
घ्याला आसुसलेल ,ती एकटी नव्हती खूप सारे
जन होते आणि त्या सगळ्यांनी मिळून
वृषलीचा जीव घेतला होता खालच्या घरातून
वृषलीला ओढून नेऊन तिचा जीव घेण्यात
आला होता,तिची चीर फड करण्यात
आली होती.कारण टी बिचारी निरागस
होती ,आणि एकटी होती ,
जसे जसे ते सगळे पिशाच .भूत,जवळ येत होते
एक प्रकारची सांगू न
शकणारी नकारर्थी ऊर्जा माधवला जाणवत
होती आणि त्याला आपला अंत दिसत होता, पाण
अचानक तो भाना वर आला ,आणि त्याने
वृषलीला हातात उचलून त्या माळ्यावरून पळू
लागला,त्याचे मागे ते सर्व पिशाच पळत होते
विचित्र आवाज काढत ,पन ,माधव कसं
बसा त्या माळ्याच्या पायर्या पर्यन्त
आला ,आणि त्याने पट पट पायर्या उतरून घरं
बाहेर धाव घेतली ,त्याच्या मागे
अजूनही ती पिशाच होती त्याचा जीव
घेण्या साथी पाण जसा माधव ने
उंबरा ओलांडला तसी ती सर्व पिशाच मागे
सरकली .माधव तसाच पळत होता जो पर्यन्त
मानवी वस्ती येत नाही तो पर्यन्त ,त्याने
स्वतचा जीव कसं बसा वाचवला पाण
वृषलीला त्याने स्वतहून त्या मृतूच्या दाढेत
ढकलले होते ,हाच विचार करून तो मोठ मोठयाने
रडत होता पुन्हा पुन्हा वृषलीला मिठी मारत
होता ,पाण आता खूप उशीर
झाला होता वृशाली केव्हाच ह्या जगातून
गेली होती ..कायमची ......
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel