भूखंडात एखादा कोपरा म्हणजे दोन बाजूमधील कोन नसेल तर असा भूखंड हा अशुभ ठरतो.

ईशान्य कोपरा : भूखंडात ईशान्य कोपरा खंडित असेल तर सुखात कमतरता निर्माण होते. यश लवकर पदरात पडत नाही. मन:शांती आणि देवांची कृपा मिळत नाही. भाग्योदय आणि धनसंचय होत नाही.

आग्नेय कोपरा :जर एखाद्या भूखंडाचा आग्नेय कोपरा खंडित  झालाअसेल तर उत्साह किंवा चैतन्य यांचा अभाव उत्पन्न होतो. कामात लक्ष लागत नाही. नैराश्य येते. गृहसौख्य, वैवाहिक सौख्य बिघडते. घरात सतत वाद होतात.

वायव्य कोपरा : जर एखाद्या भूखंडात वायव्य कोपरा नसेल तर असा भूखंड अशुभ असतो. यामुळे शत्रुपीडा निर्माण होते. हितशत्रू त्रास देतात. वादविवाद, कलह, भांडणे निर्माण होतात, मन:शांती नाश पावते.

नैऋत्य कोपरा :जर एखाद्या भूखंडाचा नैऋत्य कोपरा खंडित असेल तर त्याची अनिष्ट फळे मिळतात. आरोग्य बिघडते. व्याधी निर्माण होतात, सुखात बाधा येते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel