स्मशानात पूर्वी
मुडदा एखादा यायचा,
रडता रडता सारा
गाव गोळा व्हायचा...

हल्ली स्मशानातही
मुडदे रोज येऊ लागले
येण्याआधी कित्येक
बेवारस होऊ लागले

जाती पातीचा आता
भेदभाव नव्हता,
सजलेल्या तिरडीला
मानकरीही नव्हता....

खरंच मरणाचे हाल
कवडीमोल  झाले
गर्दीत मुडदे बेवारस
होऊ झाले...

संजय सावळे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel