मी सुद्धा चुकलो/ चुकले असेन,
एवढं मनात आणा
धनुष्य मग हातातलं,
संयमानंच ताणा!

बाणच हळू कानात सांगेल,
ठेव मला भात्यात!
एवढं ऊन एवढा पाऊस,
असणारच की नात्यात!

वादा जवळ गप्प बसून,
संवाद करू गप्पा!
तुटण्या किंवा उसवण्याचा,
येतच नाही टप्पा!

अन्याय झाला वाटतं तेव्हा,
पहिलं प्रेम आठवा!
आठवणीतलं ऐश्वर्य मग,
आतल्या खणात साठवू...

तेवढाच क्षण टळल्यावरती,
आकाश होतं साफ!
दव होऊन गारवा देते,
तीच गरम वाफ!

एक क्षण आवेगाचा,  
फुटण्यापुर्वी अडवा!
डोळे सुद्धा राग बोलतात,
पदरामागे दडवा....

थोडी गुदमर थोडी घुसमट,
उंबरठ्यावर दाटेल!
राख झाली तरी चालेल,
असं वाटेल.....

दिवस रात्र असणारच,
आपण पूर्व बघू!
मुळात आपण वारकरीच मग निघू कि पंढरपुरी!!

पहिली ठिणगी पडते तेव्हा,
विचार व्हावा पाणी!
मनात सूर जपतो तेव्हाच,
शब्द होतात गाणी!

कधीकधी आठवण्याहून,
विसरण्यातच मजा!
बेरजेपेक्षा कधीकधी ,
जोडून देते वजा

बाकी उरणं महत्वाचं,
तीच श्री शिल्लक!
कविता आहे साधी,पण्
विचार मात्र तल्लख!त

बाकी उरणं हीच श्री शिल्लक ....!!
राहून गेले कधी काही सांगायचे  तरी ती
श्री शिल्लक ...!!

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel