प्रिय मैत्रीण

मी आता जरा निश्चिंत झालो. म्हणजे मला तुला भेटायची जेवढी ओढ आहे; तेवढीच ओढ तुलाही मला भेटायची आहे. "ओढ" शब्दातुनच सारी आतुरता बाहेर पडते. नाही का?? तू मला माझ्या स्वभावाबद्दल विचारलंस. बरं केलंस. माझं तर या बाबींकडे लक्षच गेलं नाही कधी. एक माणूस जसा आपल्याला भेटतो त्याहीपेक्षा त्याच्या आयुष्यात त्याला वेगवेगळ्या भूमिका असतात हे पुरेपूर जाणून आहेस तू. मी सांगतो, "मी इतका शांत आहे की, समोरच्याने येऊन मला बोलतं करावं लागतं; पण नंतर त्यालाच मला शांतही बसवावं लागतं, एवढं बोलून जातो मी." तरीही आजवर एकही अशी व्यक्ती नाही भेटली जिला मनातली रेघ न् रेघ स्पष्ट सांगू शकेल. तू भेटलीस पहिली; पण तुझ्याशी बोलन म्हणजे एका विशिष्ट गोष्टीसंबंधिच बोलणं. मी तुला आजवर माझ्या आयुष्यातील इतर बाबी सांगितल्याच नाहीत. मुळात दुःख वाटणं मला पटत नाही. बरं जाऊ दे! मला तुझ्या आई-बाबांविषयी काही कळवशील का ?

तुझा मित्र
किरण पवार

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel