प्रिय मैत्रीण
तू तुझ्या आत्ता नुकत्याच आलेल्या पत्रातून माझ्या जखमांवर फुंकर मारण्याचा छान प्रयत्न केलास. प्रयत्न यासाठी की, ती जखम अशी जिच्यावर एकमेव ती "प्रेयसी" हाच उपाय आहे. पण तुझंही म्हणणं सर्व बाजूंनी योग्यच होतं. प्रत्येक गोष्ट ही गोष्टच पण माणसाचा दृष्टीकोन माणसाला माणसात असुनही दूर नेऊन सोडतो. तुझं मात्र मला आश्चर्यच वाटतं. इतकी वर्षे म्हणजे जवळपास आपल्या स्वप्नातल्या पहिल्या भेटीला आज सहा वर्षे उलटून गेली आणि तू आजवरही त्याच स्वप्नामागे धावती आहेस. तुझ्या संयमाची मी दाद देतो. मी तर एका वेळी दोन दगडांवर पाय ठेवायची घोडचूक करणार होतो. पण अशात अचानक तुझा शोध लागणं म्हणजे माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षणच म्हणावा लागेल. स्वप्नात घडायचं त्याचप्रमाणे आपण आता बोलू लागलोयं; हे तर फारच मौल्यवान. खरं तर तुला पत्र लिहिताना शब्द मध्येच हरवून जातात. तुझं कधी होतं का असं? वाट पाहतोय तुझ्या उत्तराची......
तुझा मित्र
किरण पवार