प्रिय मैत्रीण.......
कल्पना आता मात्र मला काहीतरी वेगळंच वाटायला लागलयं. अविश्वसनीय आहे जे घडतयं ते! इतके दिवस मलाही वाटत होतं; स्वप्नातून जाणवत होतं की, आपल्यासाठी साउथ इंडिया भागात कुणीतरी आहे जिला फक्त मी हवायं अन् तसच तुझही होतं. तूही कल्पना करत होतीस की, अगदी कुणीतरी आहे; ज्याला फक्त तु हवी आहेस बाकी काहीच नको. फक्त आपल्या दोघांना एकमेकांच मन हवं होतं. आणि जे पत्राद्वारे जोडल्या गेलयं. काय नशीब आहे??? पण एवढ्या करता कितीतरी खस्ता खाल्ल्या आपण. तुला तुझ्या घरच्यांनी या अशा स्वप्नरंजनातून बाहेर येण्यासाठी चक्क तीन वेळा मानसतज्ञ पालथे घातले. आणि तरीही तू मला स्वप्नात पाहणं सोडलं नाहीस. आणि एक मी होतो, जो प्रेमात पडून तुझ्या स्वप्नातलं जग जगत होतो. वाटायचं ज्या मुलीवर प्रेम केलंय ती तूच असशील तर आणि साउथ इंडिया चा भाग हा भास असेल तर?? पण सोड आता चिंता मिटली. एकदाची मला तू भेटली.
तुझा मित्र
किरण पवार