आसवांत मी नहात गेलो , दुनियेला असा पाहत गेलो .
रंग दुनियेचे ते पाहूनी , विचारांत मी बुडत गेलो .

माणसांत या आजच्या , कालचा माणूस मी शोधीत गेलो.
द्वेष,मत्सर,स्वार्थाचीच बीजे, पाहूनी मीच पुरता खचत गेलो .

माणूसकी शोधावया मी , माणसांच्या त्या गर्दीत गेलो .
का बदलली एवढी मनं ? याचाच शोध मी घेत गेलो .

दिशा दिशा होत्या काळवंडलेल्या, अन् नीतीचा प्रकाश मी शोधत गेलो .
आजच्या याच विश्वात मी , या कसल्या निरपेक्ष आशा ठेवत गेलो .
कालच्या त्या तिरंग्याकडे आज पाहूनी , असा मी माझ्याच आसवांत संपत गेलो .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel