छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनक्रम थोडक्यात खाली दिलेला आहे-

    १९ फेब्रुवारी १६३० - शिवाजी महाराज यांचा जन्म.
    मार्च १६३७ - जिजाऊंनी शिवाजींना पुणे येथे आणले.
    १६ मे १६४० - शिवाजी व सईबाई निंबाळकर यांचा विवाह.
    इ.स. १६४५ - किल्ले रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ.स्त्रियांची अब्रू लुटणाऱ्या गुजर पाटलाला कडक शासन.
    इ.स. १६४६ - कानंद खोऱ्यातील तोरणा किल्ला जिंकुन स्वराज्याचे तोरण उभारले.
    इ.स. १६४७ - कोंढाण्यावर विजय.मुरुंबदेवाचा डोंगर जिंकुन त्याचे नाव राजगड ठेवले.
    इ.स. १६४८ - पुरंदर किल्ला जिंकला.
    इ.स. १६४९ - जिंजी येथून शहाजी रावांची व कान्होजी जेधेंची सुटका
    इ.स. १६५६ - त्यांचे जेष्ठ बंधू संभाजीराजे यांचे कनकगिरी येथे तोफेचा गोळा लागुन निधन.
    ३० एप्रिल १६५७ - जुन्नर या ठाण्यावर छापा.पुष्कळ मालमत्ता हस्तगत.
    १४ मे १६५७ - महाराणी सईबाईच्या पोटी शंभूराजांचा जन्म.
    २४ ऑक्टोबर १६५७ - दुर्गाडी किल्ल्याची पायाभरणी. अपार द्रव्यसाठा सापडला.पुरंदरचे किल्लेदार नेताजी पालकर यांना सरसेनापती पदावर बढती.
    ५ मार्च १६५९ - ३०० होनात पोर्तुगालची तलवार विकत घेतली.
    ५ सप्टेंबर १६५९ - पत्नी सईबाईंचे निधन
    १० नोव्हेंबर १६५९ - अफजलखान वध.
    २ मार्च १६६० - सिद्धीचा पन्हाळगडास वेढा
    ५ एपिल १६६३ - पुण्याच्या लालमहालावर छापा.
    १६६४ - शहाजी महाराजांचे कर्नाटकात होदीगरे येथे निधन.
    १४ एप्रिल १६६५ - पुरंदरची लढाई
    १३ जून १६६५ - पुरंदरचा तह
    २४ फेब्रुवारी १६७० -सोयराबाईच्या पोटी राजाराम याचा जन्म
    ६ जून १६७४ - शिवरायांचा राज्याभिषेक
    १७ जून १६७४ - जिजाऊंचे निधन वयाचे ७७व्या वर्षी
    २४ सप्टेंबर १६७४ - शाक्य पद्धतीने शिवाजीचा दूसरा राज्याभिषेक
    ३ एप्रिल १६८० - शिवरायांचे निधन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel