गेला तरी सुखें जावो नरकासी । कळकीया विशीं सीवों नये ॥१॥

रजस्वला करी वेलासी आघात । अंतरें तों हित दुरी बरें ॥२॥

उगीच कां आलीं नासवावीं फळें । विटाळ विटाळें कालवुनी ॥३॥

तुका म्हणे लोणी घालुनी शेणांत । उपेगाची मात काय तेथें ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel