अरुण वि .देशपांडे
 
मनात खूप काही
नित्य साठुनी राहते
उसळे आतूनी ते
कविता होऊनी येते …… !

कवितेचे असे येणे
कधी सहज नसते
पहावी लागते वाट
कधी कधी ते सुचते ….!

वाटते क्षणात जमावी
कवी सारखीच कविता
नंतर कळे असे नसते  
कविता वेगळी असते ….!

ज्याची त्याची असते
लेखनाची प्रतिभा
मनापासूनी जी येते
कविता आपली असते ….!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel