एका माणसाजवळ एक हंसी होती. ती दररोज एक सोन्याचे अंडे घालीत असे तेवढ्या अंड्यावर त्या माणसाने समाधानी असायला हवे होते परंतु तसे न होता त्याचा सोन्याचा लोभ अधिकच वाढत चालला.

एके दिवशी त्याला असे वाटले की, ज्या ठिकाणाहून अशी अंडी निघतात ते ठिकाण आपणास मिळाले तर खूप संपत्ती आपल्याला मिळेल म्हणून त्याने हंसीचे पोट चिरून पाहिले, परंतु त्यात काहीच मिळाले नाही व हंसीसुद्धा मरण पावली आणि दररोज मिळणारे एक अंडसुद्धा त्याला मिळेनासे झाले.

तात्पर्य

- अतिलोभ बहुतेक वेळा नाशास कारण होतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel