काही हंस व बगळे एका शेतातले धान्य खात असता त्या शेताचा मालक अचानक तेथे आला. त्याला पाहताच बगळे हलक्या अंगाचे असल्यामुळे ताबडतोब उडून गेले व हंस जड अंगाचे असल्यामुळे त्या शेतकर्‍याच्या तावडीत सापडून प्राणास मुकले.

तात्पर्य

- दुष्टांच्या संगतीत सापडलेले सज्जन शिक्षेस पात्र होतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel