उन्हाने त्रासलेला बैल जवळच्या ओढ्याकडे गेला आणि थोडे गार वाटावे म्हणून पाण्यात जाऊन उभा राहिला. इतक्यात एक चिलट त्याच्या शिंगावर येऊन बसले व गर्वाने म्हणाले, 'बैलोबा, मी तुझ्याशी इतकी जवळीक करतो आहे, याबद्दल क्षमा कर. माझं वजन तुला पेलत नसेल तर मला स्पष्ट सांग, म्हणजे मी उडून जाऊन पलिकडच्या झाडावर बसेन.' त्यावर बैल म्हणाला, 'अरे, तुला वाटेल तर जा नाहीतर जाऊ नकोस त्याची मला मुळीच पर्वा नाही. तुझं हे बोलणं ऐकलं नसतं तर तू येथे बसला आहेस हे सुद्धा मला कळलं नसतं.'

तात्पर्य

- काही लोकांना स्वतःला मोठे महत्त्व आहे असे वाटते. पण खरे तर लोक त्यांना कवडीचीही किंमत देत नाहीत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to इसापनीती कथा १०१ ते १५०


नलदमयंती
नागमणी एक रहस्य
टाईम मशीन-सत्य कि कल्पना
गावांतल्या गजाली
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय
आजही अश्वत्थामा जिवंत आहे का ??
पोफळीतल्या चेटकीणीच्या झिंज्या
बाजीराव मस्तानी
सोमण सरांचे भूत
महाभारतातील विस्मृतीत गेलेल्या कथा
अजरामर कथा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
शिव-परिवार प्रतिमेचे रहस्य
अगम्य (गूढ कथा)
अधिकमास माहात्म्य पोथी