एक सांबर आजारी पडले असता चरायच्या कुरणात कोपर्‍यात स्वस्थ पडून राहिले. त्या कुरणात चरणारे त्याचे मित्र व इतर प्राणी त्याला भेटायला येत. त्यापैकी प्रत्येक प्राणी त्याच्या पुढे ठेवलेल्या गवतापैकी काही गवत खाऊन जात असत. असे होता होता, ते गरीब बिचारे सांबर मरण पावले. पण ते आजारपणाने मरण न पावता त्याला भेटायला येणार्‍या प्राण्यांनी त्याच्यापुढील सगळे गवत खाऊन टाकल्याने उपासमारीमुळे मेले.

तात्पर्य

- दुष्ट मित्र हितापेक्षा अहितच जास्त करतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel