एका बागेत एक मधमाश्यांचे पोळे होते. त्यातला मध खाण्यासाठी एक अस्वल तेथे गेले. त्याने त्या पोळ्याला तोंड लावले व आता मध पिणार, तोच सगळ्या मधमाशा त्याच्यावर तुटून पडल्या व त्याच्या नाकातोंडावर चावून त्याला अगदी सतावून सोडले. त्यामुळे ते अस्वल इतके वेडावल्यासारखे झाले की रागाच्या भरात त्याने स्वतःच्या डोक्याची कातडी स्वतःच्या पंजाने फाडून टाकली.

तात्पर्य

- प्राणिमात्राच्या संतापाचा अतिरेक झाला की त्या भरात तो स्वतःलाही इजा करून घेण्यास कमी करत नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel