एक शेतकरी फार विनोदी होता. एकदा दुर्दैवाने त्याच्या घराला आग लागली असता घरातला एक उंदीर आपला जीव वाचविण्यासाठी धडपडत बाहेर आला. तो आता पळून जाणार तोच त्या शेतकर्‍याने पकडून त्याला पुन्हा आगीत टाकले व म्हणाला, 'अरे ज्याने तुला आजपर्यंत खाऊ घालून तुझं पोषण केलं त्या तुझ्या मित्रावर हा वाईट प्रसंग आला असता यावेळी तू त्याला सोडून जातोस, या तुझ्या कृतघ्नपणाला काय म्हणावे.'

तात्पर्य

- स्वतःचा जीव वाचविण्यासाठी माणूस सगळ्या पुण्याईवर व सद्‌गुणांवर पाणी सोडायला तयार होईल.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to इसापनीती चरित्र आणि कथा १-५०


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गावांतल्या गजाली
सापळा
अजरामर कथा
झोंबडी पूल
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
 भवानी तलवारीचे रहस्य
भारताची महान'राज'रत्ने
रत्नमहाल
शिवाजी सावंत